मनुष्याने कसे वागू नये, याचे मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात मूर्खलक्षणे लिहिली. मुंबईतील समीर शशिकांत लिमये हे तरुण उद्योजक दासबोध प्रचारक म्हणून कार्यरत असून, दासबोधातील विविध विषयांवर निरूपण करतात. मूर्खलक्षणे या विषयावरील त्यांच्या निरूपणाचा हा २५वा भाग...
आजची ओवी
स्वयें नेणें परोपकार।
उपकाराचा अनोपकार।
करी थोडे बोले फार।
तो येक मूर्ख।।
...........
समीर लिमये मेकॅनिकल इंजिनीअर असून, be@art ही त्यांची कन्सेप्ट डेव्हलपमेंट कंपनी आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार आजच्या काळातही कसे तंतोतंत लागू पडतात, हे समजावून सांगण्यासाठी या विषयांवरील निरूपणे ते करतात.